PM Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने अनिवार्य ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा 31 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 होती.
पीएम किसान पोर्टलवर नोटीसद्वारे ही माहिती शेअर करण्यात आली आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक भूमिधर शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करते.
आता अंतिम तारीख 31 सटेंबर
सर्व पीएम किसान (PM KISAN)लाभार्थ्यांसाठी ई-केवाय (eKYC) ची अंतिम मुदत 31 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. PM किसान (PMKISAN) मध्ये नोंदणीकृत शेतकरी बांधवांसाठी E-KYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.
मोबाईल वर ऑनलाईन प्रक्रिया अशी पूर्ण करा
- PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
- पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
- आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.
- आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
- 'ओटीपी प्राप्त करा' आणि एंटर करा
- सर्व तपशील योग्यरित्या जुळल्यास, eKYC पूर्ण केले जाईल.
तुमचं मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक नसल्यास संबंधित लाभार्थीने स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. आणि आपला मोबाईल लिंक करावा. पीएम-किसान योजनेंतर्गत, सरकार प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये प्रति वर्ष एकूण 6000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते.